लग्नानंतरच्या दुसऱ्या महिन्यातच राजकुमार राव म्हणाला, 'बधाईयाँ...'

त्याच्या आणि पत्रलेखाच्या नात्यातील अतिशय गोड बातमी सर्वांसमोर आणली

Updated: Feb 1, 2022, 04:37 PM IST
लग्नानंतरच्या दुसऱ्या महिन्यातच राजकुमार राव म्हणाला, 'बधाईयाँ...'  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : जवळपास 11 वर्षांच्या नात्यानंतर अभिनेता राजकुमार राव यानं पत्रलेखा पॉल हिच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर आपण जीवनातील अतिशय आनंदी दिवसांचा अनुभव घेत असल्याचं सांगितलं. अवघ्या दोन महिन्यांतच राजकुमारनं त्याच्या आणि पत्रलेखाच्या नात्यातील अतिशय गोड बातमी सर्वांसमोर आणली. 

चित्रीकरणासाठी कायम बाहेर असणाऱ्या राजकुमारनं त्याच्या आणि पत्रलेखाच्या नात्याबाबत खुलासा केला. कोरोना काळातील लॉ़कडाऊनमुळे आम्हा एकमेकांना या नात्याला अधिक वेळ मिळाला, असं त्यानं सांगितलं होतं. 

असं हे गोड नातं आता एका अशाच वळणावर आलं जिथं राजकुमार आणि पत्रलेखानं 'बधाईयाँ'ही दिल्या. 

एका व्हिडीओमध्ये ही जोडी आनंदानं नाचताना दिसली, जे पाहून इतक्या लवकरच गुडन्यूज असे प्रश्नही चाहत्यांनी उपस्थित केले. 

पण, मुळात हा व्हिडीओ खऱ्याखुऱ्या गुडन्यूजसाठी नव्हे तर राजकुमारच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून पोस्ट करण्यात आला होता. 

बॉलिवूडमध्ये आजवर अनेक कलाकारांची नाती आकारास आली आणि या नात्यांमध्ये बरेच बदलही झाले. काही नात्यांमध्ये दुरावा आला. तर काहींमध्ये कटुता. 

राजकुमार आणि पत्रलेखा यांचं रिलेशनशिप मात्र याला अपवाद ठरलं. 11 वर्षे  रिलेशनशिपमधील वेगवेगळ्या टप्प्यांना सामोरं जात अखेर या जोडीनं त्यांच्या सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात केली.