पालक 'ह्या' वयात मुलांना शाळेत पाठवून करतात चूक, मोटिवेशन स्पीकर विक्रम शर्मा असं का म्हणतात?

 Motivational Speaker Vikram Sharma Tips: तुम्हीही तुमच्या मुलाला अडीच वर्षांचा झाल्यावर शाळेत पाठवणार असाल तर त्याआधी मोटिव्हेशनल स्पीकर विक्रम शर्मा यांचे मत नक्कीच ऐका. कदाचित यानंतर तुमचा निर्णय आणि विचार दोन्ही बदलतील.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 8, 2024, 11:28 AM IST
पालक 'ह्या' वयात मुलांना शाळेत पाठवून करतात चूक, मोटिवेशन स्पीकर विक्रम शर्मा असं का म्हणतात?  title=

 Motivational Speaker Vikram Sharma Tips: पूर्वीच्या काळी मुलं पाच वर्षांची झाली की शाळेत पाठवतं असतं. आता अडीच ते तीन वर्षांच्या मुलांना प्ले स्कूलमध्ये पाठवलं जाऊ लागलं आहे. इतक्या लहान वयात मुलांना शाळेत पाठवण्याबाबत लोकांची नेहमीच वेगवेगळी मते आहेत. काही लोक म्हणतात की, प्ले स्कूलमध्ये गेल्याने मुले शाळेत जायला शिकतात, तर काही लोकांच्या मते या वयात मुलांनी त्यांच्या पालकांसोबत राहायला हवे.

प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, वक्ता आणि कॉर्पोरेट प्रशिक्षक तसेच जीवन प्रशिक्षक विक्रम शर्मा यांनीही या विषयावर आपले विचार मांडले. लहान मुलांना कोणत्या वयात शाळेत पाठवणे योग्य? या लेखात हा मुद्दा काय आहे ते पाहू.

लहान मुलांचं शाळेच वय कोणतं?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vikram Sharma (@vikramsharma_india)

इंस्टाग्रामवरील एका व्हिडिओमध्ये विक्रम शर्मा असे म्हणताना दिसत आहेत की, पालक आपल्या मुलांना लहान वयातच शाळेत पाठवतात. काहीवेळा वर्किंग पालक हे मुलं लवकर शाळेत गेल्यावर त्यांना ऑफिसला जाणं शक्य होतं, या उद्देशाने पाठवतात. तर काही पालक असा विचार करतात की, मुलं त्यांच्याच वयाच्या मुलांसोबत अधिक चांगले रमतील.

शिक्षणाची घाई  का?

विक्रम शर्मा म्हणाले की, एवढ्या लवकर मुलाला शिकवायची काय गरज आहे? तुम्ही तुमचा मुलगा इतका हुशार होण्याची वाट पहावी की त्याच्याकडून काही चूक झाली तर तो येऊन तुम्हाला सांगू शकेल. जर त्याला शाळेत दुखापत झाली असेल किंवा कोणीतरी त्याच्याशी अयोग्यपणे बोलले असेल, तर तुमचे मूल त्याच्याशी शाळेत कसे वागले जाते याबद्दल बोलून तुम्हाला सांत्वन देऊ शकते.

अशावेळी काय कराल? 

मोटिव्हेशनल स्पीकर सांगतात की, जोपर्यंत तुमचे मूल चुकीचे वागणे किंवा त्याच्यासोबत घडलेली कोणतीही घटना समजून घेण्यास सक्षम होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला शाळेत पाठवू नका. तुम्ही मुलाला या टप्प्यावर पोहोचू द्या आणि मग त्याला शाळेत प्रवेश द्या. ते पुढे म्हणाले की, फक्त फिनलंड बघा, तिथे मुलांना शाळेत प्रवेश मिळण्याचे वय सात वर्षे आहे. येथे मूल सात वर्षांचे झाल्यानंतर औपचारिक शिक्षण पद्धती सुरू होते. फिनिश मुले शिक्षणाच्या बाबतीत उत्तम प्रगती करत आहेत.

भारतात शिक्षणाचं वय काय?

शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना इयत्ता 1 च्या प्रवेशासाठी किमान वय सहा वर्षे निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. भारतातील बऱ्याच शाळा 2.5 वर्षापासून लहान मुलांना घेण्यास सुरुवात करतात, परंतु ही वयोमर्यादा तुमचे मूल शाळेसाठी तयार असल्याचे संकेत देत नाही.