संघभूमीत येऊन भाजप खासदार वरूण गांधींनी काढले स्वपक्षीयांना चिमटे

नागपूरमध्ये आयोजित युवा सन्मान संवाद परिषद उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते. 

Updated: Apr 22, 2018, 09:30 PM IST

नागपूर : संघभूमीत येऊन भाजप खासदार वरुण गांधी यांनी स्वपक्षीयांनाच चिमटे काढलेत. विरोधी पक्षातही तज्ज्ञ सदस्य असतात. त्यामुळे त्यांना मंत्रीपदं देऊन त्यांचा सन्मान करता येईल का याचा विचार व्हायला हवा असं मत भाजप खासदार वरुण गांधी यांनी मांडलंय. नागपूरमध्ये आयोजित युवा सन्मान संवाद परिषद उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते.