आयुष्यभर मला 'या' गोष्टीची खंत राहिल, सुरेश रैना नेमकं काय म्हणाला?

मिस्टर आयपीएल

टीम इंडियाचा माजी स्टार खेळाडू आणि मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

समालोचन

सुरेश रैना सध्या आयपीएलमध्ये समालोचन करत आहे. आपल्या कारकीर्दीत अनेक सामने जिंकवणाऱ्या रैना आयुष्यभर एका गोष्टीची खंत राहिल.

एका गोष्टीची खंत

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सुरेश रैनाने मोठं वक्तव्य केलं. खूप खेळलो अन् नाव कमवलं पण मला एका गोष्टीची खंत आहे, असं रैना म्हणतो.

पिंकी दिदी

मला आयुष्यभर माझ्या सख्या बहिणीच्या (पिंकी दिदीच्या) लग्नाला जातं आलं नाही, याचं दु:ख राहिल, असं रैना म्हणाला.

सर्वात मोठी मॅच

झालं असं की, 2006 मध्ये माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी मॅच होती. त्यावेळी इस्ट झोनसोबत आमचा सामना होता. कॅफ आमचा कॅप्टन होता.

टीम इंडियामध्ये सिलेक्शन

या सामन्यात मी 130 धावा केल्या होत्या, त्याच मॅचमुळे माझं टीम इंडियामध्ये सिलेक्शन झालं आणि ही मॅच नेमकी माझ्या दिदीच्या लग्नाच्या दिवशी होती.

लग्नाचा अलब्म पाहताना...

मॅचमुळे मला माझ्या सध्या दिदीच्या लग्नात जाता आलं नाही. पण आत्ता लग्नाचा अलब्म पाहताना दु:ख होतं, असं सुरेश रैनाने म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story