PHOTO : IAS च्या नावाखाली दिल्लीला पळाला, मुंबईच्या चाळीत राहिला, अनेकांनी नाकारल्यानंतर आज बॉलिवूडचा मालामाल अभिनेता

Entertainment : एखाद्या अभिनेत्याच्या संघर्षाची कहाणी ऐकून आपल्याला विश्वास बसत नाही. अनेक वेळा तो रिजेक्ट झाला. अगदी एकेकाळी या अभिनेत्याचा फोटो कचऱ्याचा पेटीत फेकला होता. 

Apr 23, 2024, 09:30 AM IST
1/9

आई वडिलांना मुलाला डॉक्टर बनवायचं होतं. पण तो IAS च्या नावाखाली दिल्लीला पळून आला होता. एवढंच नाही तर मुंबईत तो चाळीत राहायचा, खाण्यासाठीही त्याच्याकडे पैसेही नव्हते. 

2/9

'फॅमिली मॅन', 'गँग्स ऑफ वासेपूर', 'गुलमोहर', 'सत्या', 'शूल' या चित्रपटातून चाहत्यांना प्रत्येक वेळी आश्चर्यचकित केलं. कळलं ना आम्ही कोणाबद्दल बोलत आहेत ते.

3/9

आज मनोज बाजपेयी यांचा वाढदिवस आहे. आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि मालामाल अभिनेत्याला या यशाची चव चाखण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. 

4/9

बिहारमधील बेलवामध्ये जन्म झालेल्या मनोज यांना 5 बहिणीभावंड होते. वडील शेतकरी, आर्थिक परिस्थिती बेताची होती. बारावी झाल्यानंतर आयएएस होण्यासाठी खोटं बोलून मनोज दिल्लीला पळून आले. 

5/9

NSD मध्ये पुन्हा पुन्हा नापास झाल्यानंतर त्यांनी एका बाजूला पथनाट्य करायला सुरुवात केली. NSD मध्ये प्रवेश न मिळाल्याने मनोज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नंतर मनोज यांनी बॅरी जॉनच्या अभिनय शाळेत प्रवेश घेतला. 

6/9

पहिला चित्रपट बँडिट क्वीनमधील मानसिंगची भूमिका नसीर साहेबांनी नाकारल्यामुळे मनोज बाजपेयीला मिळाली. या भूमिकेसाठी त्याला 50 हजार रुपये मिळाले होते. त्यांनतर 7 मित्रांसोबत मुंबईत चाळीत राहू लागला. त्याला बॉलिवूडमध्ये खूप संघर्ष करावा लागला. 

7/9

सत्यानंतरही त्याचा संघर्ष 7 वर्ष सुरु होता. 2012 मधील गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटानंतर तो रातोरात स्टार झाला. 

8/9

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, मनोज यांचे दोन लग्न झाले आहेत. पहिलं लग्न हे दोन महिन्यांमध्येच तुटलं. अभिनेत्री नेहा अर्थात शबाना रझाशी हंसल मेहताच्या पार्टीत भेट झाली. 

9/9

तो नेहाला पाहता क्षणीच प्रेमात पडला. नेहामधील सर्वात आवडीची गोष्ट म्हणजे ती केसांना तेल लावून पार्टीत आली होती. त्यांनी एकमेकांना जवळपास 7 वर्षे डेट केल्यावर लग्न केलं.